#YesNewsMarathi #Solapur #chaitanyamaharajdeglurkar
समाधान ही एक अवस्था आहे. अनेकजणांना समाधान ही घटना असल्यासारखे वाटते. आनंद हा विषयात सामावलेला नसतो. तर तो आनंदापर्यंत नेणाऱ्या चित्त वृत्तीत सामावलेला असतो. त्यामुळे वृत्ती स्थैर्य हेच आनंदाचे गमक असल्याचे प्रतिपादन चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी केले.
श्रीरामकृष्ण सेवा प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे चैतन्यमहाराज देगलूरकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.जैसी दिपकाळिका धाकुटी हा त्यांच्या प्रवचनाचा विषय होता. रविवारी प्रवचनाचा समारोप झाला. यावेळी त्यांनी आनंद या विषयासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. नव्याने मिळवणं काही नाहीच आहे.जे आहे ते जाणून घेणं आहे.मुळात देव मिळावा म्हणून ज्ञानेश्वरी,गाथा नाही. तर मिळालेला देव कळवा यासाठी ज्ञानेश्वरी,गाथा आहे. संशय येणे हे देखील बुद्धीचे गुण आहे. संशयाची उत्पत्ती ज्ञान आणि अज्ञानाच्या संधीतून होते. याची जाणिव बुध्दीमुळे होते. बुध्दीच्या दोन शक्ती आहेत.यात प्रज्ञा व मेघा यांचा समावेश आहे. विपत्तीच्या काळात मार्ग काढण्याचे काम बुध्दी करते. त्यामुळे कुणावर अवलंबून न राहता आपल्या बुध्दीवर अवलंबून राहा, असेही ते म्हणाले.ऐका काय म्हणतात चैतन्य महाराज देगलूरकर सविस्तर...
★Follow us, Share, Support★
Website:- yesnewsmarathi.com/
Facebook:- / yesnewsmarathi
Twitter:- / yesnewsmarathi
★Contact us★
mobile- 9881748329
Email:- yesnewsmarathi@gmail.com
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
Негізгі бет ऐका चैतन्य महाराज देगलूरकर यांना...
Пікірлер: 87