बाळशास्त्री हरदास यांच्या हृदय आठवणी सांगितल्या आहेत त्यांच्या पत्नी वीणाताई हरदास यांनी. आणि त्यांच्याशी संवाद साधलेला आहे प्रमोद मांडे यांनी.
महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास हे महाराष्ट्रातील एक प्रकांड पंडित व्यक्तिमत्व. सर्वंकष पांडित्यपूर्ण, रससांद्र वक्तृत्व आणि तेवढीच विद्वत्तापूर्ण खंडात्मक ग्रंथसंपदा हे त्यांचे वैशिष्ट. ॠग्वेद, अर्थववेद, आरण्यके, उपनिषदे, वाल्मिकी रामायण, महाभारतातील व्यक्तिरेखा, भागवत, पुराणं, आद्य शंकराचार्य, वेदातील राष्ट्रदर्शन, आर्य चाणक्य, भारतीय स्वातंत्र्यसमर, पुण्यश्लोक शिवाजी, स्वा. सावरकर, डॉ. हेडगेवार, धर्मवीर मुंजे यांसारख्या अनेक विषयांवरील लेखन व व्याख्याने. सुमारे दोन हजार साहित्य समीक्षणे, तेही विद्वत् ग्रंथावर लिहिणारा असा हा ‘साहित्य समीक्षक’ विरळाच म्हणावा लागेल. त्यांचा अव्याहत व्यासंग पाहून गोवर्धनपीठाच्या शंकराचार्यांनी त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही पदवी प्रदान केली होती. ३० जुलै १९१८ चा त्यांचा जन्मदिवस आणि ११ ऑगस्ट १९६८ रोजी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.
'दुर्गमहर्षी' प्रमोद मांडे हे कार्यक्रमानिमित्त नागपूर येथे गेले असताना बाळशास्त्री हरदास यांच्या पत्नी वीणाताई हरदास यांच्याशी त्यांनी संवाद साधला. वीणाताई हरदास याही संतसाहित्याच्या अभ्यासिका व लेखिका होत्या. त्यांचे हस्ताक्षर सुंदर असल्यामुळे अनेक वर्षे त्यांनी बाळशास्त्रींच्या लेखनिक म्हणूनही काम केले. बाळशास्त्रींच्या अनेक आठवणी त्यांनी या संवादादरम्यान सांगितल्या आहेत. वीणाताई हरदास यांचा जन्म ११ एप्रिल १९२९ रोजी व निधन २८ एप्रिल २००९ रोजी झाले.
(प्रमोद मांडे यांचे क्रांतिकारक व शिवाजी महाराजांवरील विचार ऐकण्यासाठी, आमच्या चॅनेलचे इतर व्हिडीओ आवर्जून पहा)
Please Like and subscribe our Channel
Негізгі бет बाळशास्त्री हरदास यांच्या हृदय आठवणी सांगितल्या आहेत त्यांच्या पत्नी वीणाताई हरदास यांनी.
Пікірлер: 10