Balumama Krupa Part - 1214|#gurupournima |#balumamaserial |#balumamasong |#balumamatemple
gurupournima
त्रिभुवनिंचे सुख पाहावया नयनीं ।
दिनरात्रीं धणी न पुरे माझी ॥१॥
विटेवरी सांवळा पाहतां पैं डोळां ।
मन वेळोवेळां आठवितु ॥२॥
सागरीं भरीतें दाटे तैसें मन नटे ।
वाट पाहों कोठें तुझी रया ॥३॥
बापरखुमादेविवरु पूर्ण प्रकाशला ।
कुमुदिनी विकासला तैसें जालें ॥४॥
अर्थ:-
त्रिभुवनाचे सुख जो परमात्मा त्याला रात्रंदिवस पाहण्याविषयी माझ्या डोळ्यांची तृप्ती होत नाही. जो विटेवर असलेला सांवळा विठोबाराय त्याची मन वारंवार आठवण करीतच असते. सागरामध्ये जशी भरती दाटते त्याप्रमाणे मन त्याच्या चिंतनांत रंगून जाते. आतां तुझी कोठे म्हणून वाट पाहुं. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते सर्वत्र पूर्ण प्रकाशीत आहेत हे कमळिणीच्या विकासावरून जसे कळून येते त्याप्रमाणे अंतःकरणवृत्तीच्या विकासावरून त्याचे प्रकाशत्व कळून येते. त्या कमळिनीप्रमाणे माझे मनाची स्थिती झाली आहे. असे माऊली सांगतात.
पंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा ।
विठो देखियेला डोळां बाईयेवो ॥१॥
वेधलें वो मन तयाचियां गुणीं ।
क्षणभर विठ्ठलरुक्मिणी न विसंबे ॥२॥
पौर्णिमेचें चांदिणे क्षणक्षणा होय उणें ।
तैसें माझे जिणें एक विठ्ठलेंविण ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलचि पुरे ।
चित्त चैतन्य मुरे बाईये वो ॥४॥
अर्थ:-
भुवैकुंठ जे पंढरपूर तेथे वास करणारा शामसुंदर लावण्याचा पुतळा जो श्रीविठ्ठल तो मी डोळ्यांनी पाहीला. रुक्मीणीचा वर जो श्रीविठ्ठल त्याच्या गुणाच्या ठिकाणी मनाचा वेध लागल्यामुळे त्याला क्षणभर सुद्धा विसरत नाही. पौर्णिमेचे चांदणे ज्याप्रमाणे प्रत्येक क्षणाला कमी होऊन जाते. त्याप्रमाणे श्रीविठ्ठलावांचून माझ्या मनाची स्थिति होते म्हणजे मी प्रत्येक क्षणाला झुरणी लागते.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच एक मला पुरे. कारण माझे चित्त त्या परमात्म्याच्या ठिकाणी लय पावते. असे माऊली सांगतात
पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकूनगे माये सांगतसे ॥१॥
उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानें
मढीन पाऊ ।
पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताचीं उंडी लाविन तुझ्या तोंडी ॥
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगीं ॥३॥
दुधें भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो
येईल कायी ॥४॥
आंबयां डाहाळीं फ़ळें चुंबी रसाळीं ।
आजिचेरे काळीं शकून सांगे ॥५॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराणे शकून सांगे ॥६॥
अर्थ:-
एक विरहिणी, विरहाने दुःखित होऊन बसली असता आपल्या घरांवर पलीकडच्या बाजूला कांवळा कोकू लागला. तो शुभ शकुन सांगतो आहे.असे समजून शुभशकुन सांगणाऱ्या कावळ्याला म्हणते उड रे उड काऊ, तुझे पाय सोन्याने मढविन पण एवढे सांग की माझ्या घरी पंढरीराव पाहुणे कधी येतील. दहीभाताची उंडी करून तुला खाऊ घालीन पण जीवाला प्रिय असणाऱ्या पंढरीरायांची गोडी केंव्हा प्राप्त होईल. ते लवकर सांग.दुधाने वाटी भरून तुझ्या ओठाला लावीन पण तो विठोबाराय माझ्या घरी येईल काय हे खरे सांग.आंब्याच्या डहाळीला आलेली रसाळ फळे ही चाख, पण आजच्या वेळी मला शुभशकुन सांग. अशा त-हेची तळमळ लागली असता पंढरीराजे भेटतील, असा शकुन सांग.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
Негізгі бет Balumama Krupa Part - 1214|
Пікірлер: 55