आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा हे गाणे गुणगुणत लोक आनंदाचा शोध घेत आहेत मात्र आनंद, सुख, समाधान शोधूनही न सापडण्यासारखे आहे. मनचंगा तो कठौतीमे गंगा असे संत रोहिदास महाराजांनी म्हटले आहे त्याप्रमाणे मानले तर सुख नाहीतर सगळीकडे दुःखच दुःख पहायला मिळेल. सुखाचा शोध घेण्यामध्ये लोक कस्तुरी मृगाप्रमाणे पळत आहेत. कस्तुरी मृगाच्या बेंबीत आहे. कस्तुरीचा सुवासाने मनगंधीत होत आहे मात्र ते मृग कस्तुरीच्या शोधासाठी संपूर्ण आयुष्य धावपळ करीत संपून जाते. दुसऱ्याची जिरवण्यामध्ये सुख मानणारे अनेक महाभाग आपण पाहतो मात्र त्याच्या लक्षात येत नाही की दुसऱ्याची जिरवण्यामध्ये आपल्या आयुष्यातील सुखाला आपण पारखे होत आहोत. यातूनच शेवटी पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. भाऊबंदकीत जमीन,प्रॉपर्टी आणि संपत्तीच्या वादातआयुष्यातील अनेक वर्षे निघून जातात त्याबरोबर सुखाचे क्षण करपून जातात. हे समजायला माणसाला आत्मकेंद्री बनावे लागेल
#chandalchaukadichyakaramati #dhangarijivan #ganeshshinde #laxmikantbhise #ravishinde #farming #marathi #punamtupe #manus
Негізгі бет भाऊबंदकीत जमिनीच्या वादात सुखाचे क्षण करपले
Пікірлер: 1