#BolBhidu #MaharashtraPolitics #VidhanSabhaElections
लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना गळती लागल्याचं पाहायला मिळालं होतं. काँग्रेससह शरद पवार गट आणि ठाकरे गटातल्या अनेक आजी माजी आमदार, खासदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीतल्या पक्षांमध्ये प्रवेश केला होता. पण लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात परतीचे वारे वाहू लागले आहे. महायुतीतले अनेक इच्छुक उमेदवार महाविकास आघाडीचा रस्ता धरू लागले. त्यातही सगळ्यात मोठी गळती भाजपला लागल्याचं दिसून येतंय. मंगळवारी भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. यापूर्वी सूर्यकांता पाटील, सुधाकर भालेराव, शिवाजीराव नाईक आणि विनायक पाटील यांनी देखील तुतारी हाती घेतलीय. एकीकडे पक्षाला गळती लागलेली असतानाच दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात मोठं विधान केलंय.
भाजपमध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 24 नेते अस्वस्थ असून, त्यापैकी चार ते पाच जण पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याची माहिती त्यांनी दिलीय. भाजपकडे 24 नेते असे आहेत, जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना प्रचंड ताकदीनं आव्हान देऊ शकतात. त्या 24 जणांना आता आपल्या राजकीय वाटचालीची चिंता वाटतेय. त्यामुळे पक्षात थोडी अस्वस्थता आहे, असं वक्तव्य बावनकुळेंनी केलं. बावनकुळेंच्या या वक्तव्यानंतर आता भाजपचे ते २४ नेते नेमके कोण आहेत? आणि भाजपमध्ये अजित पवार गटाविरोधात कोणते नेते अस्वस्थ असू शकतात? पाहुयात या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Chandrashekhar Bawankule यांनी उल्लेख केलेले भाजपचे अस्वस्थ नेते कोण ? Ajit Pawar गटाशी संघर्ष काय ?
Пікірлер: 59