सातपुड्याच्या धडगाव तालुक्यातील खुटवडा व वेहगी ता. अक्कलकुवा येथील गावात रस्ता व पुल नसल्याने जीव धोक्यात घालून नदी गर्भवती महिलेला बांबूच्या झोळीत घेऊन ओलांडणारे आदिवासी पाहिले की रक्त खवळते..! सांबार, वेलखेडी या अतिदुर्गम भागातील शाळेत भेट द्यायला अधिकाऱ्यांना जावे लागू नये म्हणून सोयी ठिकाणी शिक्षण परिषद घेणारे प्रशासन आदिवासींना काय किंमत देत असतील याचा विचार न केलेला बरा..! सातपुड्यातील आदिवासींना जनावरासारखी वागणूक देणारे शासन आदिवासींचा फक्त कागदावर विकास करते. आदिवासी विकासपुरुष म्हणवणारे आमदार, खासदार, मंत्री आता दिल्ली मुंबईला गायब होतील आणि आदिवासींचे हाल मात्र कुत्रेही विचारणार नाही असे असतील. स्वातंत्र्याच्या ७८ वर्षात व्यवस्थेने आदिवासींना दिलेला हा विकास आदिवासींचे जल, जंगल व जमीन हिसकावून, आदिवासींना नागडे करून केला आहे. आणि आदिवासींना काय भेटले..? व्हिडिओ नक्की बघा, शेअर करा.
जोहार, जय आदिवासी...!!
- डॉ. कैलास वसावे
Негізгі бет हा बघा आदिवासींचा कागदावर झालेला विकास, अधिकारी-नेते व सरकारच्या उदासीनतेमुळे जातो आदिवासींचा जीव
Пікірлер: 10