सह्याद्रीच्या द-या खो-यांमध्ये, निसर्गाच्या कुशीत अनेक गावे वसलेली आहेत. अशा प्रत्येक गावांचे काही ना काही वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील माचाळ हे गाव असेच वेगळेपण जपलेले आणि ढगांचे माहेरघर, मिनीमहाबळेश्वर या नावांनी प्रसिध्द असे आहे. निसर्गसौंदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांबरोबरच ट्रेकर्सना देखील नेहमी खुणावते. महाबळेश्वर नंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून हे फार प्रसिध्द आहे.
पावसाळ्यात माचाळला जाताना जणू ढगातून चालत असल्याचा भास होतो. पृथ्वीवरील स्वर्ग नेमका काय असतो हे अनुभवायचे असल्यास प्रत्येकाने माचाळला अवश्य भेट देणे आवश्यक आहे.
माचाळच्या डाव्या बाजूला पाऊण तास चालत गेल्यावर मुचकुंदी ऋषींची गुहा आहे. गुहेकडे जाताना मुचकुंदी नदीचे उगमस्थान आहे. सहयाद्री पर्वत रांगा ओलांडत येणारे ढग माचाळला जणूकाही वस्तीच करतात. त्यामुळे बाजूला असलेल्या माणूस सुध्दा दिसणे कधी-कधी अशक्य असते. वेगवान वारा आणि जोडीला रिमझिम पाऊस हा अनोखा संगम माचाळला अनुभवायला मिळतो.
#trekking #mountains #adventure #camping #naturelovers #trek #forest #trekkinglovers #konkan #Machal #hillstation #trekkingadventures
Негізгі бет ढगांचे माहेरघर माचाळ | Machal Hill Station | रत्नागिरी । माचाळ । कोकणातलं मिनी महाबळेश्वर |
Пікірлер: 12