#womenempowerment #maharashtra #water #women #solution #BBCMarathi
साताऱ्याचा दुष्काळी पट्टा माण-खटाव हा भाग उन्हाळ्यात चर्चेत येतो. यंदा या परिसरात सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडला. या भागात जलसंधारणाच्या काही कामांना यशही आलं आहे. असाच एक प्रयत्न आठ वर्षांपूर्वी माणच्या सहा गावांमध्ये सुरू झाला. महिलांना पाऊस-माती-खडक याविषयी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देत पाणी शाळा भरू लागल्या तेव्हा महिलाच नाही तर पुरूषही सहभागी झाले. पण गावात पाणी आणण्याची प्रक्रिया राबवली गेली ती या महिलांच्या नेतृत्वाखाली. त्यांना आता जलनायिका म्हणून ओळखलं जातं. गावा-गावात ही प्रक्रिया राबवली गेली पाहिजे तरच सरकारी योजनांची अंमलबजावणी लोकांच्या सहभागातून होईल असं त्यांचं म्हणणं आहे. हे काम म्हणजेच त्यांचा जाहिरनामा आहे असं निवडणूक लढवणाऱ्या पक्षांना त्या सांगतायत. कणखर महिला या विशेष मालिकेतील जलनायिकांची कहाणी.
रिपोर्ट आणि निर्मिती- प्राजक्ता धुळप
शूट- नितीन नगरकर
व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Maharashtra Water Crisis : पाणी शाळेत शिकून माणच्या महिलांनी जमिनीखाली पाणी कसं टिकवलं?
Пікірлер: 131