#BolBhidu #PawanKalyan #Chiranjeevi
राजकारणात जायचं, पक्ष काढायचा, जागा लढवायच्या, जिंकायचं आणि सत्ताधीश व्हायचं चिरंजीवीनं हे स्वप्न पाहिलेलं २००८ साली, जे भंगायला ३ वर्ष लागले आणि निवडणुक फक्त एक. चिरंजीवीनं आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. त्याला राजकारणात सपाटून मार खावा लागला, पक्ष गेला, भाऊ दुरावला, नात्यात वितुष्ट आल्याची चर्चा झाली, लोकांनी कोनीडेला कुटुंबालाच राजकारणातून बाद केलं. कट टू १२ जून २०२४, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून चंद्रबाबू नायडू यांनी शपथ घेतली, पवन कल्याणनं मंत्रीपदाची शपथ घेतली, त्यानंतर पवन कल्याणनं मोदींना एका माणसाला भेटण्याची विनंती केली. मोदी त्या माणसासाठी जागेवर थांबले नाहीत, उलट स्वतः त्याच्याकडे गेले, पवन कल्याण आणि त्या माणसाचा हात एकत्र घेत उंचावला, त्या माणसाचं नाव होतं मेगास्टार चिरंजीवी.
राजकारणाच्या पिक्चरमधून पुसलं गेलेलं कोनीडेला कुटुंबाचं नाव पवन कल्याणनं पुन्हा वर आणलं, नुसतं वर नाही आणलं तर हिट केलं, त्यानं फक्त सत्ता नाही मिळवली, त्यानं आपल्या सक्ख्या मोठ्या भावाच्या अपमानाचा बदला पूर्ण केला, अपमान कुटुंबातला, अपमान राजकारणातला. ही गोष्ट पवन कल्याणनं घेतलेल्या बदल्याची.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Pawan Kalyan ने फक्त Election जिंकलं नाही, सख्ख्या भावाच्या अपमानाचा बदला पूर्ण केला, त्याचीच स्टोरी
Пікірлер: 359