शंकर भटांना चिदंबरला पोहोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गांव लागले. त्या गावाच्या नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्तन करणारा होता.
त्या राजास एक मुलगा होता. परंतु तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असे. त्याला वाटे की ब्राह्मणांनी लोपभूइष्ट असा यज्ञ केल्याने त्याचा मुलगा मुका झाला.
तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसवून त्यांची मरवणूक काढीत असे. ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे. त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीस प्राप्त झाले होते.
एका विद्वान ब्राह्मणास राजाने मूक भाषेवर ग्रंथ लिहिण्याची आज्ञा केली होती. त्या राजाज्ञेनुसार ते राजगुरु ब्राह्मण मूक भाषेवर संशोधन करु लागले होते.
शंकर भट्ट विचीत्रपुरतून जाताना राजाच्या सैनिकांनी आपण ब्राह्मण आहात का? असा प्रश्न विचारला. ते व्हा शंकर भट म्हणतात
मी होकारार्थी मान हालविताच “आपणास आमच्या महाराजांचे आग्रहाचे आमंत्रण आहे” असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली.
मी त्यांच्याबरोबर राजा समोर उभा राहिलो. मला भीतीने घाम सुटला होता. मी तेव्हा मनोमन श्री श्रीपाद वल्लभांची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो.
राजाने मला पहिला प्रश्न विचारला,” तेवढ्यास एवढे तर एवढ्याला किती होईल ? मी गंभीरपणे उत्तर दिले “एवढ्याला एवढेच” माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला “महात्मन् आपण मोठे पंडित आहात. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो.”
राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरूवात केली. तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता. त्याच्या घरी राजगीरा पिकत असे. ती भाजी तो सर्वांना मुक्त हस्ताने देत असे.
त्याच्या सहाय्यक ब्राह्मणां कडून यजमानांच्या घरी पूजा, अर्चा, अभिषेक आदि करवून घेत. यजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणास देत असत.
त्यांच्या घरची राजगिऱ्याची भाजी सुद्धा फुकटच घेत. कालचक्र फिरत गेले. दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण, राजा म्हणून जन्मला आणि त्याला त्रास देणारे, लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मी सुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले.
तो राजा पूर्वीच्या जन्मी दिलेल्या राजगिऱ्याच्या भाजीच्या दानाच्या कैकपट या जन्मात दान देत होता. त्याला अचाट दानाचे फळ काय मिळेल याचे उत्तर हवे होते.
मी राजाला म्हणालो “महाराज राजगिऱ्याची भाजी कितीहि दान केली तरी तिच्या शंभर पटीने तीच भाजी आपणास मिळेल. सध्याच्या परिस्थितीत रत्न, मणी, सोने आदि दान करणे तुझ्या हिताचे आहे.”
माझ्या उत्तराने राजास आनंद झाला. आता दुसरा प्रश्न मूक भाषेचा होता. राजगुरुंनी माझी परिक्षा घेण्यासाठी आपली दोन बोटे दाखवून एक का दोन असे खुणेनेच विचारले.
त्यांनी मला एकटाच आलास का सोबत कोणी आहे, असा प्रश्न वाटून मी एकटाच आलो असे दर्शाविण्यास एकच बोट दाखवून खुणेनेच उत्तर दिले.
त्यानंतर त्यांनी तीन बोटे दाखविली. तीन संख्या पहाताच मला दत्तात्रेयांची त्रैमूर्ति आठवली. तुम्ही दत्तभक्त आहात का, असा प्रश्न वाटला. मी भक्ति ही गुप्त असावी असे जाणून हाताची मूठ बंद करून दाखविली व भक्ति हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले.
नंतर राजगुरुंनी गोड पदार्थाचा, मिठाईचा भंडारच मला देत असल्याची खूण म्हणून तसे हातवारे केले, परंतु मी हाताने ते नाकारले व माझ्या जवळ असलेले पोहे पुरचुंडीतून काढून त्यांना दिले.
मला गोड पदार्थापेक्षा पोहेच जास्त आवडतात, तुम्ही सुद्धा यांची चव पाहू शकता, असा माझा भाव होता. माझ्या उत्तरांनी राजगुरु अतिप्रसन्न झाले आणि राजास म्हणाले
“राजा हा फार मोठा पंडित आहे. हा मुक्यांच्या भाषेत सुद्धा मोठा पंडित आहे.” दोन परिक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो. आता तिसरी परिक्षा डोळ्यासमोर भेडसावित होती.
राजगुरुंनी सांगितले “चमक” मधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा. मी श्रीपाद श्रीवल्लभांचे मनोमन स्मरण करीत एक एक श्लोक वाचला व त्याचा अर्थ सभेस समजावून सांगितला.
माझे हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटले. मी जे काही बोललो ते सर्व सृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते. ते कणाद ऋषींना माहित होते. परमाणूंच्या सूक्ष्म कणांच्या भेदामुळेच विविध धातुची निर्मिती होते.
माझे प्रवचन दरबारातील सर्वानाच खूप आवडले. राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यामुळे व श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने मी त्या विचित्रपूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडलो.
#अध्यात्मिकीकरण
#video
#श्रीपादश्रीवल्लभ
Негізгі бет श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांमृत अध्याय दुसरा | श्री श्रीपाद श्रीवल्लभ कथासार |
Пікірлер: 1