Register heirs now in just 15 days
करुन घ्या वारस नोंद आता फक्त १५ दिवसात.
Mission for Law Education.
१. अनेक जणांची ब-याच दिवसापासूनची मागणी आहे की मी वारस नोंद या विषयावर एखादा व्हिडिओ प्रसारीत करावा. तर मित्रांनो आजचा विषय आहे वारसनोंद कशी करावी, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतात, कशाप्रकारे अर्ज करावा, वारस नोंदणीची प्रक्रीया कशी असते, या सर्व गोष्टींची सखोल चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. मुख्यत्वे शेतजमीनीबाबत वारसनोंद करुन घेणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळं आज आपण प्रामुख्यानं शेतजमीनीची वारसनोंद कशाप्रकारे करुन घ्यावी याबाबतच बोलणार आहोत. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी वारसनोंदीचा कानमंत्र घेवून आलोयं. तर तयार आहात ना वारसनोंद कशी करावी ते ऐकायला. मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल. चला तर मित्रांनो उदाहरणासहीत जाणून घेवूया कशी करावी वारसनोंद...
२. राजाराम आप्पा यांच्या पश्चात त्यांना तीन मुले आणि दोन मुली आहेत. राजाराम यांची पत्नी यापुर्वीच देवाघरी गेलेली आहे. राजाराम यांच्या नावावर दहा एकर जमीन आहे. एक मुलगा वगळता त्यांची दोन्ही मुलं शहरात राहतात. मुली दिल्या घरी सुखी आहेत. राजाराम यांच निधन झाल्यानंतर ते सारे गावी आलेले होते. सगळे विधी आटोपल्यानंतर गावातल्या जुन्या जाणत्या लोकांनी त्यांना सुचवले की राजाराम आप्पांची जमीन तुमच्या नावावर लागलीच फिरवून घ्या. तुम्ही सगळे आला आहात तर वारस नोंदीचा अर्ज तलाठ्याकडं देवून लगेच वारस नोंद करुन घ्या. सर्वांनी यावर विचारविनीमय केला. त्या भावंडात हेवेदावे मुळीच नव्हते. ३ महिन्याच्या आत वारसनोंद करणं गरजेच होतं, तेव्हा त्यांनी विचारपुर्वक निर्णय घेतला.
३. सगळ्या भावंडांनी राजाराम आप्पांना यापुर्वी दिलेल्या वचनाप्रमाणं दोन्ही बहिणींना साडीचोळीचा हक्क देण्याचे सर्वानुमते मान्य केलं गेलं. राजाराम आप्पांच्या मुलीही सुखवस्तु असल्यानं त्यांनी तिन्ही भावांच्या लाभात शेतजमिनीचे हक्कसोडपत्र करुन देण्याच मान्य केलं. बहिणींना पुन्हा पुन्हा याव लागू नये म्हणून बहिणींच्या संमतीने साडीचोळीचा हक्क अबाधीत ठेवून दोनशे रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर विनामोबदला हक्कसोडपत्र करुन घेवून ते तालुक्याच्या दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवून घेतलं. तत्पुर्वी आनंदानं म्हणजेच राजाराम आप्पासोबत राहणा-या मुलानं वारसनोंदीच्या अर्जावर सगळ्या भावंडांच्या सह्या घेतल्या. त्यांनंत १०० रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर एक शपथपत्र तयार या शपथपत्रात त्यांनी सर्व वारसदारांची नावे, वय व पत्ता आणि या व्यतिरिक्त कोणीही वारस नसल्याचं आवर्जून नमूद केलं गेलं. आणि ते शपथपत्र तहसिलदारांकडून त्यानं प्रमाणित करुन घेतलं.
४. आनंदानं आणलेल्या वारसनोंदीच्या अर्जात राजाराम आप्पांचा मृत्यु कोणत्या दिवशी झाला ती तारीख, व त्यांच्या नावावर कोणकोणत्या गटातील किती जमीन आहे. आणि राजाराम आप्पांना किती वारस आहेत. ही सारी माहिती त्यात नमुद करण्यात आली. अर्जासोबत ग्रामपंचायत कार्यालयातुन काढुन घेण्यात आलेला मृत्युचा दाखला, पोलिस पाटलाकडून घेण्यात आलेला वारस दाखला, त्यांच्या नावावरील जमिनीचे आठ-अ चे उतारे, सर्व वारसदारांचे पत्ते, मृताबरोबर असलेले वारसदारांचे नातेसंबंध आणि तहसिलदारांसमोर करण्यात आलेलं शपथपत्र ही सर्व कागदपत्र सोबत जो़डून परिपुर्ण असलेला वारसनोंदीचा अर्ज पाच रुपयाचं कोर्ट फी तिकीट लावून तलाठी कार्यालयात सादर करण्यात आला.
५. मित्रांनो सदरचा अर्ज प्राप्त होताच गावकामगार व तलाठी यानं त्या अर्जाची नोंद गाव नमुना ६ क मध्ये घेतली. गावातील सरपंच, पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिकांना विचारणा करून वारसांनी अर्जात दिलेल्या माहितीची चौकशी करून वारस रजिस्टरमध्ये वारस ठराव मंजूर केल्यानंतर फेरफार रजिस्टर मध्ये तलाठ्यानं नोंद घेतली. आणि तलाठी कार्यालयामार्फतीनं सर्व वारसदारांना नोटीस दिली. नोटीस दिल्यानंतर १५ दिवसात कुणीही हरकत न घेतल्यानं या फेरफार नोंदीबाबत कायदेशीररीत्या त्यानं आदेश काढला. त्यानंतर ती नोंद मंडल अधिका-यानं प्रमाणित केली. अशाप्रकारे राजाराम आप्पांच्या पश्चात त्यांच्या वारसांची नोंद करण्यात आली. तर मित्रांनो या ठिकाणी हे ही लक्षात ठेवा की जर, वारस नोंदीबाबत कुणी हरकत घेतली असती तर, त्या व्यक्तीला आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली गेली असती.
६. आज आपणं पाहिलेलं उदाहरण शेतजमिनीच होतं. याच प्रकारानं तुम्हाला तुमच्या घराची वारसनोंद, सिडकोच्या मिळकतीची तसेच म्हाडाच्याही मिळकतीचीही वारसनोंद करुन घेता येते. तर मित्रांनो कोणत्याही स्थावर मिळकतीच्या नोंदी वेळच्या वेळी करुन घेणं आवश्यक असतं. त्या जर वेळच्या वेळी घेतल्या गेल्या नाहीत तर काळाबरोबर काही गोष्टीत बदल होवू शकतो. म्हणजेच समजा एखाद्या वारसानं आपल्या एकट्याची वारस म्हणून नोंद करुन घेतली तर तुम्हाला अडचण निर्माण होवू शकेत. म्हणूनच स्थावर मालमत्तेच्या बाबतीत मात्र सगळ्या नोंदी वेळच्या वेळी करुन घ्या आणि निश्चिंत व्हा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत वारसनोंदीबाबत इतकचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, वारसनोंदीची ही माहिती सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची असल्यानं हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीच्या व्हाटसप ग्रुपवर फॉरवर्ड करण्यास विसरु नका.
७. बरं का मित्रांनो याबाबत तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समधुन बिंधास विचारा. मी अशाच प्रकारचे कायद्याचे व्हिडिओज तुमच्या फायद्यासाठी नेहमीच घेवून येत असतो. माझे व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलचं बटन दाबून, नोटीफीकेशन ऑन करुन, माझं चॅनेल लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जयहिंद. जय महाराष्ट्र.
Adv. Dhanraj Kharatmal., B.Com.,LLB
V Education
#LegalHeir#MaharashtraGovernmetn#SaatBaara#PropertyCard
Негізгі бет Register heirs now in just 15 days I करुन घ्या वारस नोंद आता फक्त १५ दिवसात.
Пікірлер: 923