"सावित्रीने तिचा नवरा स्त्यवन यांना मृत्यूच्या पंजेतून कसे परत आणले ते पहा.." श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण वटसावित्री व्रताची कहाणी ऐकणार आहोत. पांडव वनवासात असताना एकदा युधिष्ठिराची मार्कंडेय ऋषींशी भेट झाली. युधिष्ठिर भावुक झाला आणि त्यांना म्हणाला, "हे मुनिवर! मला आणि माझ्या भावांना या वनवासात भोगाव्या लागणाऱ्या कष्टांचा तेवढा त्रास होत नाही जेवढा द्रौपदीला सोसाव्या लागणाऱ्या दु:खाबद्दल होतो. दुर्दैवाने द्रौपदीला भरल्या राज्यसभेत अपमानीत व्हावं लागलं. नंतर जयद्रथाने तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. द्रौपदीसारख्या पवित्र स्त्रीविषयी तुम्ही कधी ऐकलं आहे का? की जिला इतकं दु:ख भोगावं लागलं आहे? युधिष्ठिराकडून हे सगळं ऐकल्यानंतर ज्ञानी आणि धर्मात्मा मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराला राजकुमारी सावित्रीची ही कहाणी सांगितली होती. प्राचीन काळी मद्र देशावर अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. अश्वपती अत्यंत धार्मिक व प्रजावत्सल राजा होता. सर्व प्रकारच्या वैभवाने त्याचं राज्य समृद्ध होतं, तरीही त्याला संतती नसल्याचं अतिशय दु:ख होत असे. संततीप्राप्तीच्या इच्छेने राजाने अठरा वर्ष एक हजार यज्ञ करुन ब्रह्मदेवाची पत्नी गायत्री मातेला प्रसन्न केलं. माता गायत्री यज्ञाच्या अग्नीकुंडातून प्रकट झाली, तिने राजाला वर मागण्यास सांगितलं. राजा अश्वपतीने हात जोडून देवीला वंदन केलं आणि म्हणाला, “हे जगत् जननी! मला पुत्र व्हावा म्हणून आपण काही उपाय सुचवावा अशी आपल्याकडे विनंती करतो.” देवी गायत्री राजाला म्हणाली, "राजर्षी! मला तुझी इच्छा आधीच माहित आहे, म्हणूनच मी इथे प्रकट होण्यापूर्वी याबाबत जगत्पिता ब्रह्मदेवांशी विचारविनिमय केला. आणि त्यांच्या इच्छेनुसार मी तुला एक कन्या प्राप्त होईल असा आशीर्वाद देत आहे." राजाने जगत्पित्याच्या इच्छेला आपले सौभाग्य मानून देवीला वंदन केलं आणि म्हणाला, "आपल्या आणि जगत्पित्याच्या इच्छेनुसार योग्य काय ते घडेल."
#bhakti #marathi #mahabharat #vatpournima
Негізгі бет सावित्री आणि सत्यवान यांची गोष्ट | वट सावित्री | वट पौर्णिमा | Savitri - Satyavan | Mahabharata
Пікірлер: 3