दिंडोरी तालुक्यात असलेल्या ओझरखेड येथील कादवा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या खाजगी कंपनीत कामाला असलेला कामगार बुडाल्याची भीती व्यक्त
मराठा आरक्षणाचा राज्यात पहिला बळी गेलेल्या काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधिचा कार्यक्रम औरंगाबाद -पुणे महामार्गावर कायगाव टोका येथे होता त्यानिमित्ताने जेथे काकासाहेब शिंदे हे जलसमाधी आंदोलनादरम्यान मराठा आरक्षणासाठी शहीद झाले त्या कायगाव पुलाला "काकासाहेब दत्तात्रय शिंदे सेतू " असं नाव देऊन त्यांना श्रद्धांजली देण्यात आली...
जिल्ह्यातून तसेच अनेक भागांतून मराठा समर्थक या कार्यक्रमाला हजर असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता...
कुणीही काकासाहेब सारखं कृत्य करू नका...
आंदोलनाचे अनेक पर्याय आहेत..
मुख्यमंत्र्यांनी तत्काळ आरक्षण द्यावं..अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे..
असं सरकारला, मराठा तरुणांना भावनिक आवाहन अविनाश शिंदे यांनी दशक्रिया विधीच्या कार्यक्रमावेळी केलं...
नाशिक महामार्गांवरील चाकण येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी आंदोलन कर्त्यांनी खेड तालुक्यातील चाकण राजगुरूनगर शहरात पुणे नाशिक महामार्ग रोखून धरत रास्ता रोखो आंदोलन केले. परंतू या आंदोलना ला चाकण मध्ये हिंसक वळण लागले आंदोलन कर्त्यांनी महामार्गावरील १० पेक्षा जास्त बसेस तसेच ईतर वाहनांची जाळपोळ केली. या वेळी आंदोलन कर्त्यांनी ८० पेक्षा जास्त वाहनांची ही तोडफोड करत तब्बल ५ तास महामार्ग रोखून धरल्याने महामार्गांवरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत २० पेक्षा जास्त अश्रृधूराचे नळकांडे फोडले परंतू जमाव हिंसक झाल्याने महामार्गावरील अनेक वाहनांची तोडफोड जाळपेळ करण्यात आली. या वेळी आंदोलनामध्ये अनेक पोलिस अधिकारी ही जखमी झाले आहेत. आता पोलिसांकडून चाकण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली असून कलम १४४ लागू केला आहे.
मीरा-भाईंदर महानगर पालिका पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल झालेल्या ५ रुग्णांचा मृत्यू झाला. एका आठवड्यात पांच रुग्णांचा मृत मुळे लोकांमध्ये नाराजगी आहे. या करता आज मनसे कार्यकर्ता यानी आंदोलन केले..
मीरा-भाईंदर महानगर पालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालय. या रुग्णालयात एक आठवड्यात पांच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मुळे
रुग्णांचा नातेवाईक मध्ये तीव्र नाराजी पसरली आहे . लोकांनी रुग्णालय प्रशासनवर हलगर्जीपणाचा आरोप लावला . मृतकांच्या नाव आजाद अन्सारी , राजेश चव्हाण संतोष थापा गोपी निषाद आणि उपेंद्र यादव आहे.
चाकण हिंसे प्रकरणी अटक सत्र सुरू झालं आहे. पोलिसांनी काल रात्री कारवाई सुरू केली असून ऐकून वीस जणांना अटक केलं आहे. मात्र अद्याप त्यांची नाव समोर आली नसून गुप्तता बाळगली आहे.
चौघे रात्री बारापर्यंत तर आणखी सोळा असे एकूण वीस जणांना अटक केली आहे. अशी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना पहिल्यांदा अटक. यामध्ये चाकण मध्ये कामासाठी आलेले, झोपडपट्टी आणि आस-पासच्या ग्रामीम भागातील व्यक्तींचा समावेश आहे. आज पुणे न्यायालयात हजर करण्याची शक्यता.
चंद्रपूर पोलिसांनी दारू तस्करीची आणखी एक भन्नाट आयडिया आज उघड केली आहे. दारू तस्करांनी चक्क खाद्य तेलाच्या डब्ब्यांचा या दारू तस्करीसाठी वापर केल्याचे समोर आले आहे. नागपूर मधून तेलाचे हे डब्बे दारू भरून चंद्रपूर ला आणले जायचे आणि मग हे डब्बे छोट्या विक्रेत्यांकडे पाठवले जात होते. तेलाचे हे डब्बे अतिशय व्यवस्थित पॅकिंग केलेले असल्यामुळे कोणाला याचा संशय आला नाही. मात्र पोलिसांना दारू तस्करीच्या या अनोख्या पद्धतीची गुप्त माहिती मिळाली होती आणि या आधारे आज संध्याकाळी रामनगर पोलिसांनी दवाबाजार परिसरातील एका घरावर छापा मारला. या वेळी अशा प्रकारे तेलाच्या डब्ब्यात ठेवलेली जवळपास ७० ते ८० पेट्या दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी धनंजय शास्त्रकार आणि कमलाकर वलदे या २ आरोपींना अटक केली आहे.
चंद्रपूर महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रांमध्ये मागील चार महिन्यांपासून औषधसाठा नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामुळं रुग्णांचे मोठे हाल सुरू आहेत. या आरोग्य केंद्रांत जाणा-या रुग्णांना बाहेरून औषधी घ्यायला सांगितलं जात आहे.
व्ही. ओ. : चंद्रपूर महानगरपालिकेचे शहरात सात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. सर्वसामान्यांना मोफत आरोग्यसेवा मिळावी, यासाठी या रुग्णालयांचं संचालन महापालिका करीत असते. मात्र, या रुग्णालयांमध्ये मागील चार महिन्यांपासून औषधीच उपलब्ध नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. चंद्रपूर शहरातील सातही आरोग्य केंद्रे आजारी पडल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. यामुळं रुग्णांना पैसे खर्च करून बाहेरून औषधी घेण्याची वेळ आली.
Негізгі бет सकाळची खबरबात 9 AM
Пікірлер