संसार उध्वस्त करी दारू । बाटलीस्पर्ष नका करू ।
या आणि अश्या आशयाच्या अनेक जाहिराती आपण टीव्ही, वर्तमानपत्र, सिनेमागृह, रेडिओ, रस्त्यावरील भिंती, मोठमोठाले होर्डिंग्ज यावर पाहतो, ऐकतो. व्यसन मग ते दारू असो, धूम्रपान असो किंवा आम्ली पदार्थांचे सेवन असो फक्त व्यसनी माणसाचे आरोग्यच नाही तर त्याचे सामाजिक आणि वैवाहिक/कौटुंबिक आयुष्यावर घातक परिणाम करते. हीच समाजातील महाभयानक कीड ओळखून परमपूज्य जगद्गुरुश्रींनी व्यसनमुक्ती करण्यास सुरुवात केली. यामध्ये कोणतेही औषध अथवा गंडे-दोरे न देता केवळ प्रबोधनाच्या माध्यमातून आलेल्या लोकांचे सर्व प्रकारचे व्यसन सोडवण्यात येते. आतापर्यंत जवळपास पाच ते सहा लाख लोकांची व्यसनमुक्ती नाणीजधाम येथे करण्यात आली आहे. व्यसन केले की काय होते, व्यसन कश्याप्रकारे त्यांच्या कुटुंबाची वाताहत करते, या व्यसनामुळे कसे लोक आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या विसरून आपल्या मुलाबाळांची देखील अवहेलना करतात. याने केवळ एकच नाही तर पुढील पिढीचेही आपण कसे हाल करतो, त्यांचे भविष्य बिघडवतो, हे परमपूज्य स्वामीजी आपल्या प्रबोधनाद्वारे समजावून सांगतात, त्याची जाणीव करून देतात.
स्वामीजींच्या उपदेशाने व्यसनग्रस्त व्यक्तीवर नक्कीच सकारात्मक परिणाम होतो.
Негізгі бет व्यसनमुक्ती मार्गदर्शन दिनांक ०४ मे २०२२ श्रीक्षेत्र नानीजधाम
Пікірлер