#BolBhidu #DhuleLoksabha #DhuleLoksabhaResult
मराठा आरक्षण, काही जागांवर उमेदवारांच्या निवडीत झालेली चूक आणि संविधान बदलाचं नरेटीव्ह ही लोकसभेत महायुतीच्या पराभवाची मुख्य कारणं सांगितली जात आहेत. पण भाजपच्या विधीमंडळ गटाच्या बैठकीत काही जागांवरच्या पराभवाचं पॉलिटीकल अर्थमॅटीक देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. महाविकास आघाडीला मराठी माणसांच्या नाही तर एका विशिष्ट समाजाच्या मतांमुळं काही जागांवर लीड मिळाल्याचं फडणवीस म्हणाले. या जागांमध्ये फडणवीसांनी विशेष उल्लेख केला तो धुळ्याच्या जागेचा. धुळे लोकसभेतल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या सुभाष भामरे यांना लीड मिळालं होतं. पण मालेगाव मध्य या एका मतदारसंघातून मिळालेल्या लीडमुळं धुळ्यातून काँग्रेसच्या शोभा बच्छाव निवडून आल्या.
मालेगाव मध्य या एका विधानसभा मतदारसंघातून जवळपास दोन लाखांचं लीड मिळाल्यामुळं धुळे लोकसभेत काँग्रेसच्या शोभा बच्छाव विजयी झाल्या. म्हणूनच धुळे लोकसभा मतदारसंघात शोभा बच्छाव यांच्या विजयापेक्षा सुभाष भामरेंच्या पराभवाची जास्त चर्चा होतेय. याच चर्चांमागची नेमकी कारणं काय, धुळ्यात या एका मतदारसंघातून काँग्रेसला लीड कसं मिळालं, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Dhule LokSabha मध्ये ५ विधानसभेत आघाडी पण BJP चे Bhamre हरले, कॉंग्रेसच्या शोभा बच्छाव कशा जिंकल्या?
Пікірлер: 646